शिक्षक कट्टा

शिक्षक कट्टा

Saturday, April 15, 2017

[4/14, 05:32] ‪+91 73875 17534‬: 💎🌐   *_विश्वरत्न ._*  🌐💎
🏳‍🌈 *_डाँ बाबासाहेब आंबेडकर ._*🏳‍🌈
💢 _यांचे प्रेरणादायी विचार._💢
🌾🌾 *K.*Ⓜ ®  🌾🌾
*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये !!!*

*१) "शिका...! .*
*संघटीत व्हा...!.*
*संघर्ष करा....!"*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१८) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१९) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२०) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२१) "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२२) "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२४) नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा.......!!
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२५) माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा.....-
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२६) जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२७) "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
[4/14, 08:38] Shendge Angad: *भारतीय घटनेचे शिल्पकार
#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर....
यांच्या #१२६ व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*‘‘शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!’’*

#टोपणनाव :~ बाबासाहेब,
*#जन्म :~ एप्रिल १४, इ.स. १८९१*
     महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
# *मृत्यू :~ डिसेंबर ६, इ.स. १९५६*
             दिल्ली, भारत
#पुरस्कार : ~ भारतरत्न (१९९०)
#वडील:~सुभेदार रामजी सकपाळ
#आई:~ भीमाबाई रामजी सकपाळ
#पत्नी नाव:~ रमाबाई आंबेडकर,
        डॉ. सविता आंबेडकर

 *●डॉ. भीमराव रामजी आंबेडकर●*
  *⟢⚞⚟⟢⚞⚟⟢⚞⚟⟢⟣⚞⚟⟢*
      🔹 हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

    🔸ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबा’ म्हणजेच ‘पिता’ किंवा 'वडील' आणि ‘साहेब’ हा आदर व्यक्त करण्यासाठीचा शब्द आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

     🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.
  *शैक्षणिक विचार*
   🔸शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.
      🔹पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानी.
   🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देश हिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

   🔸१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.

   ६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे १२.१५ वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

   🔸बोधिसत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
    ──┅━━═▣✧▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

➖➖➖➖➖➖➖➖➖

मला या देशाची राज्यघटना लिहीतानी कोणतीही अडचण नाही आली कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य उभा होतं.
-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे
जो पिल तो गुरगुरल्याशिवाय
राहणार नाही.....

 शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा...
*डॉ.भीमराव रामजी आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा॥
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥
जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥
भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
"दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
➖➖➖➖➖
🖊* 🖊
स्वामी विवेकानंद म्हणतात:
"माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील", चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघड ठेवतिल.. "परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात , तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात".."लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन आयझॅक, यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल"..

- स्वामी विवेकानंद

बाबासाहेब अम्बेडकर विचार

बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे :~

१. भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले.
तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले.

याबरोबरच "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल" देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला.

५. प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. "रिजर्व बँक ऑफ इंडिया"च्या स्थापनेचा पाया रचला.

७. संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही "चूल आणि मुल" सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली.
(*जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून दिला.

११. पुरुषांना एकपत्नित्व अधिकार...
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. नियोजन आयोगाची स्थापना केली.

१३. पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.

१४. भारतात प्रथम जलनिती तयार केली व "नद्या जोडणी प्रकल्प" आखला पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...

१६. 'कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला.

१८. भारतात बालमजुरीवर रोख लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान,
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती...

२०. मजुरांना १२ तास काम करावे लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला.

२१.  ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, कामाचा मोबदला (ओवरटाईम) प्रावधान लागू केले.

२२. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला उच्च-नीच जातीवादातून मुक्त केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना समान अधिकार मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान.

२६. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. “मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन” अशी घोषणा केली...

२८. "मजुरमंत्री" असतांना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी ‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना केली.

३०. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी RCC (रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी विभाजन करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले...

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. स्त्रीभ्रूण हत्त्या विरोध, व गर्भपात करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला उपराजधानी ची गरज आहे हे सांगणारे प्रथम व्यक्ती...

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी कृषिमंत्री होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. एकमात्र भारतीय ज्यांना ब्रीटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे विशेष निमंत्रण दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.

४६. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि पाली व्याकरण व शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली...

४७. त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके : ~
महार वतन बिल,
हिंदू कोड बिल,
जनप्रतिनिधी बिल,
खोत बिल,
मंत्र्यांचे वेतन बिल,
रोजगार विनिमय सेवा,
पेंशन बिल,
भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ.

४८. मराठी हि राजभाषा व्हावी यासाठी संसदेत मत मांडले...

४९. पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...

५०. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती....

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस. सी. पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा भारतीय...

५३. देशात भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला वैयक्तिक आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार म्हणून
मूकनायक,
बहिष्कृत भारत,
प्रबुद्ध भारत

जनता
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. 'बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध...

६०. बहुजनांसाठी मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य...

६३. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला...

६५. “UNTOUCHABILIT”  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान...

६७. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना :

बहिष्कृत हितकारणी सभा,
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन इ.

६८.पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ...

६९. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.

७०. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता मिळवून दिली...

७४. भारताला राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह” मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला तिरंगा व त्याच्या मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜भारतरत्न (भारत सरकार),

⚜द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया विद्यापीठ),

⚜द युनिवर्स मेकर (ऑक्सफर्ड विद्यापीठ),

⚜द ग्रेटेस्ट इंडियन (CNN IBN व History वृत्त वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब....

८४. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री,
समाजशास्त्री,
विधिज्ञ,
राज्यघटनाकार,
आधुनिक भारताचे जनक,
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
मानववंशशास्त्र अभ्यासक,
पाली साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “बोधिसत्व”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक
होते....

⚜💎🕯📚🕯💎⚜

वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.

वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
“आधुनिक भारत देशाचा निर्माता” (NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे विश्वरत्न, बोधिसत्व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....
💐💐💐💐💐JAIBHIM💐💐💐💐💐💐बाबासाहेबांच या देशाला सगळ्यात मोठ योगदान हे भारतीय संविधान आहे. तसेच जे बर्याच जणांना माहीत आहे व ज्यांना नाहीत हे खालील प्रमाणे:

कामगारांना मिळणार्या प्राथमीक सेवा ह्या फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झाल्या.
*रोजगार बदली- Employment Exchange*
*बाबासाहेब*

*कामगार राज्य विमा- Employees State Insurance-ESI*
*बाबासाहेब*

*कामाचे तास: १२ तासाचे ८ तास- Working Hours 12 Hrs to 8 Hrs*
*बाबासाहेब*

*कामगार संघटनेची मान्यता- Compulsory Recognition for Trade of Union*
*बाबासाहेब*

*महागाई भत्ता- Dearness Allowance-DA*
*बाबासाहेब*

*पगारी सुट्ट्या- Paid Holidays*
*बाबासाहेब*

*आरोग्य विमा- Health Insurance*
*बाबासाहेब*

*कायदेशीर संप अधीकार- Legal Strike Act*
*बाबासाहेब*

*निर्वाह निधी- Provident Fund-PF*
*बाबासाहेब*


*कामगार कल्यान निधी- Labour Welfare Fund*
*बाबासाहेब*

*तांत्रिक प्रशिक्षण योजना- Technical Training Scheme*
*बाबासाहेब*

महत्वाचे देशाला विकसीत करुण प्रगतीकडे नेणारे कार्य:
आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांना लाजवेल असे
*मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- Central Irrigation Commission*
*बाबासाहेब*

*अर्थव्यवस्थेची तरतुद- Provision of Finance Commission*
*बाबासाहेब*

*मतदानाचा अधीकार- Right to Vote*
*बाबासाहेब*

*भारतीय सांखीकीक कायदा- Indian Statistical Law*
*बाबासाहेब*

*मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- Central Technical Power Board*
*बाबासाहेब*

*हिराकुड धरण- Hirakud Dam*
*बाबासाहेब*

*दामोदर खोरे प्रकल्प- Damodar Valley Project*
*बाबासाहेब*

*ओरीसा नदी- Orissa River*
 *बाबासाहेब*

*भाक्रा-नानगल धरण- Bhakra-Nangal Dam*
*बाबासाहेब*

*सोने नदी प्रकल्प- The Sone River Valley Project*
*बाबासाहेब*

*भारतीय रिझर्व बँक- Reserve Bank of India*
*बाबासाहेब*

*राज्य विभागणी आयोग- State Division Commission*
*बाबासाहेब*

*विद्युत-जोड प्रकल्प- Power Grid System*
*बाबासाहेब*

*नदी जोड प्रकल्प- River Grid System*
*बाबासाहेब*

स्पेशीयल महीलांसाठीच्या ऊन्नती साठी केलेले कार्य:
ज्या आज स्वाभीमानाचं जिवन जगत आहेत.
*पालकत्वाचा अधीकार- Right to Guardianship*
*बाबासाहेब*

*मालमत्तेचा अधीकार- Right to Property*
*बाबासाहेब*

*फार्कतीचा अधीकार- Right to Divorce*
*बाबासाहेब*

*प्रसूती पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
*बाबासाहेब*

*ना स्त्रि..ना पुरुष*
*समान कामाला समान पगार- Equal Pay for Equal Work*
*बाबासाहेब*

*महिला कामगार संरक्षण कायदा- Women Labor Protection Act*
*बाबासाहेब*

Ref:
*https://www.quora.com/Is-Ambedkar-the-founding-father-of-modern-India*

*Lets Salute to the First Greatest Indian, The Real Architech of India, The Father of Indian Constitution, Father of Economy,Bodhisatva, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar..Jay Bhim-#SK_BLUE*

दप्तर

दप्तर